December 29, 2022

सामान्यज्ञान : विज्ञानावरील काही महत्त्वाची माहिती

 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत विज्ञान विषयातील काही महत्त्वाची माहिती.

 मिथेन वायू ला मार्शगॅस असेही म्हणतात.

 पोलाद ही लोखंडाचे संमिश्र आहे.

माणूस 0  ते 80 डेसिबल क्षमतेपर्यंतचा आवाज सहन करू शकतो.

 सरासरी प्रौढ माणसाच्या हृदयाची 72 ठोके पडतात.

 बेरीबेरी हा रोग थायमिनच्या अभावामुळे होतो.

स्कर्व्ही हा रोग 'क' जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो.

' ड ' जीवनसत्वाच्या अभावामुळे मुडदूस हा रोग होतो.

 'अ' जीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा हा रोग होतो.

कॅरोटीन घटकामुळे दुधाचा रंग पांढरा होतो.

शरीरातील सर्वात मोठी नलिका विरहित ग्रंथी म्हणजे यकृत.

कॉलरा रोगामुळे शरीराचे निर्जलीकरण होते.

इन्सुलिन हे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवते.

इन्सुलिनच्या अभावामुळे मधुमेह हा आजार होतो.

कुष्ठरोग बरा करण्यासाठी औषध- डॅप्सोन.

सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी आठ मिनिटे लागतात.

 क्ष - किरणांच्या सततच्या सानिध्याने कर्करोग होतो.

गॅमा किरणांचा मारा केल्यास फळे अनेक दिवस टिकतात.

प्लास्टिकच्या पिशव्या इथेनिल पासून तयार होतात.

निष्क्रिय वायूंना O गणांमध्ये स्थान दिले जाते.

सोने या मूलद्रव्याची संज्ञा- Au.

शरीरामध्ये 65 टक्के पाणी असते.

 'ब' व 'क' जीवनसत्व पाण्यात विरघळतात.

खाण्याच्या सोड्याचे शास्त्रीय नाव सोडियम बायकार्बोनेट आहे.

निकटदृष्टीता हा दृष्टीदोष दूर करण्यासाठी अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरतात.

हवेचे तापमान वाढले असता ध्वनीचा वेग वाढतो.

पेट्रोलियम हे हायड्रोकार्बनचे मिश्रण आहे.

सदाफुली ही सपुष्प वनस्पती आहे.

हिरा ग्राफाईट हे कार्बन मूलद्रव्याचे रूप आहे.

निरोगी माणसाचा रक्तदाब 80 ते 120 असतो.

माणसाने वापरलेला पहिला धातू तांबे.

पोलिओची लस तोंडावाटे दिली जाते.

राष्ट्रीय विज्ञान दिन- 28 फेब्रुवारी.

विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक- अँपियर.

संगणकाचा सर्वात महत्त्वाचा भाग सिलिकॉन पासून बनविला जातो.

हॅलेचा धूमकेतू दर 76 वर्षांनी दिसतो.

भारताने पहिला अणुस्फोट  1974 साली पोखरणला केला.

गोबरगॅस हा प्रामुख्याने मिथेन वायूचा बनलेला असतो. 

मुडदूस हा रोग 'ड ' जीवनसत्व अभावामुळे होतो.

सायकलचा शोध मॅकमिलन यांनी लावला.

सिस्मोग्राफ या साधनाने भूकंप लहरी मोजतात.

कुष्ठरोगावरील प्रभावी औषध- सल्फोन.

नील आर्मस्ट्रॉंग या अमेरिकन मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले.

खडू म्हणजे रासायनिक दृष्ट्या कॅल्शियम कार्बोनेट.

भूकंपाचे मोजमाप करण्याचे एकक - रिश्टर.

 AB रक्तगटास कोणाचेही रक्त चालते. (सर्व योग्य ग्राही म्हणतात.)

हवेतील प्रमुख घटक नायट्रोजन.

रेल्वे इंजिनचा शोध -स्टीफन्स.

ग्रामोफोन चा शोध -एडिसन.

अंतराळात पहिला कृत्रिम उपग्रह सोडणारा देश रशिया.

फॉस्फरस पेंटॉक्साईड चा रंग पांढरा.

भारतातील पहिली महिला अंतरिक्ष यात्री - कल्पना चावला.

दुधाचे दही होणे ही क्रिया जैव रासायनिक.

हृदयाचे ठोके मोजण्यासाठी स्टेथस्कोप वापरतात.

वस्तू डोळ्यांपासून दूर नेल्यास त्याची आभासी प्रतिमा लहान होते.

नायट्रोजन वायूचा शोध - डॅनियल रुदरफोर्ड.

विजेच्या दिव्याचा शोध - एडिसन.

प्रौढ व्यक्तीच्या शरीरात 206 हाडे असतात.

वाफेचे इंजिन चा शोध- जेम्स वॅट.

घड्याळाच्या स्प्रिंग मध्ये स्थितिज ऊर्जा असते.

होकायंत्रात दिशा दर्शवण्यासाठी चुंबक सूचीचा वापर करतात.

भूल देण्यासाठी ऑक्सिजन आणि नायट्रस ऑक्साईड हे मिश्रण वापरतात.

निळा लिटमस आम्लामध्ये तांबडा होतो.

लिंबाच्या रसात सायट्रिक आम्ल असते.

आवळ्यामध्ये 'क ' जीवनसत्व असते.

भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट हा 1975 साली अंतराळात गेला.

 


   

शुद्ध व अशुद्ध शब्द ओळखणे



नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,

 आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी प्रज्ञाशोध परीक्षेसाठी  उपयुक्त घटक मराठी व्याकरण शुद्ध व अशुद्ध शब्द ओळखणे.


व्याकरणातील नियमांना अनुसरून केलेल्या निर्दोष लेखनाला शुद्धलेखन म्हणतात. अर्थपूर्ण शुद्धलेखनासाठी अनुस्वार ऱ्हस्व,दीर्घ व जोडाक्षरे इत्यादींचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

   शुद्धलेखनाचे काही नियम

 1) एखाद्या शब्दातील ज्या अक्षरांचा उच्चार स्पष्टपणे नाकातून होतो त्या अक्षरांवर नेहमी अनुस्वार द्यावा. उदा कांदा, भिंत, सुगंध,दिंडी, संबंध इ.

 2) एक अक्षरी शब्दातील 'इ' व 'उ'  हा स्वर दीर्घ लिहावा. उदा. मी, जी, ती, धू, जू, इ .

 3) सामान्यपणे कोणत्याही शब्दातील शेवटचा 'इ ' किंवा  'उ 'हा स्वर दीर्घ लिहावा. उदा. कवी, रवी, विद्यार्थी, गुरु,अणू,पशू इ. (अपवाद 'आणि', परंतु, तथापि.) मात्र हे शब्द जोडशब्दात प्रारंभी आले तर त्यातील शेवटचा 'इ ' किंवा 'उ ' स्वर ऱ्हस्व लिहावा.उदा. कविचरित्र, विद्यार्थिभांडार,गुरुकृपा, पशुधन इ.

 4) अकारान्त शब्दातील उपांत्य (शेवटून दुसरे अक्षर)   'इकार' व 'उकार' दीर्घ लिहावा.उदा.  वीट, मीठ,खीर, दूध, तूप, नवनीत, जमीन,कबूल इत्यादी.

 5)  शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्याच्यामागील 'इकार' व 'उकार' बहुदा ऱ्हस्व लिहावा. उदा. गरिबी, पाहुणा, किती, दिवा, महिना, नमुना, हुतुतू, बहिणी, वकिली इत्यादी.

 आता आपण इयत्ता चौथीच्या अभ्यासक्रमावर आधारित काही शुद्ध शब्द पाहूयात.

आकृती

गरीब

किंतु

यथाशक्ती

गणपतीपूजन

संसार

चिन्मय

मैत्रिणी

नीती

जीभ 

श्री

व्यूह

उभयान्वयी

विहीर

कुस्ती

दुग्ध

सूक्ष्म

चातुर्य

भूर्रकन

गतिरोधक

की 

तथापि 

निर्मळ

मतिमंद

उत्साह

नमुना

विळी 

विभूती

पीठ

मूल

नारिंगी

कुटुंब

बाहुली

कनिष्ठ

पुण्य

ग्रीष्म

दुर्बीण

मूल्य

दुर्गंध

अद्यापि 

हुकूम

भितिदायक

ऋषिपत्नी

संरक्षण

पहिला

गीता

रविकिरण

तूप

गृहपाठ

भिंग

चुंबक

किल्ला

गुप्त

पूज्य

बहिर्गोल

दुर्मिळ

गिर्‍हाईक

अंतरिक्ष

अनिल

अधीर

अधीन

इतिहास

कुकर्म

निरभ्र

विहीर

कृत्रिम

निर्जन

ज्योतिषी

प्रार्थना

संयुक्तिक

जिज्ञासू

साधर्म्य

औपचारिक

आशीर्वाद

अभ्युदय

कीर्ती

कवडीचुंबक

कनिष्ठ

उत्कृष्ट

विक्षिप्त

चिरंजीव

नियुक्त

शारीरिक

जर्जर

निष्कारण

शीर्षासन

साधर्म्य

तात्कालीक

प्रीती

तीर्थस्वरूप

ब्राह्मण

सिंह

त्रिभुवन 

चौथी प्रज्ञाशोध परीक्षा सरावसंच - 10 4TH STANDARD TALENT SEARCH EXAM GUESS PAPER



नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, आज आपण चौथी प्रज्ञाशोध परीक्षा सराव चाचणी क्र.10 सोडवणार आहोत. यापूर्वीच्या सरावचाचण्या  सोडवण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा. आपल्याला या सरावचाचण्या निश्चितच उपयुक्त ठरतील.

 



चौथीप्रज्ञाशोध परीक्षा ऑनलाईन टेस्ट क्र.10 
4TH STANDARD TALENT SEARCH GUESS PAPER 

     

December 25, 2022

12 जानेवारी - स्वामी विवेकानंद जयंती भाषण Swami Vivekanand Marathi Speech

 



12 जानेवारी - स्वामी विवेकानंद जयंती

                    12 जानेवारी - स्वामी विवेकानंद जयंती. 'तेजस्विता'  आणि 'तपस्विता' हे दोन शब्द आपल्यासमोर जेव्हा उभे राहतात , तेव्हा तरुणांचे प्रेरणास्थान म्हणून 'स्वामी विवेकानंद' यांचे नाव आपल्यासमोर उभे राहते. अशा या महान विभूतीचा जन्म 12 जानेवारी 1863 साली कोलकत्ता येथील सिमेलिया या ठिकाणी झाला. विश्वनाथ दत्त व भुवनेश्वरी देवी यांचे पुत्र म्हणजे विवेकानंद.

         स्वामीजींच्या शालेय जीवनापासून पाहिले तर असंख्य दाखले आणि उदाहरणे स्वामीजींच्या  बाबतीत पहावयास मिळतात.देव आणि धर्म,कर्मकांड यामध्ये  विभागलेल्या समाजाच्या परिस्थितीकडे स्वामीजींनी स्वतःचे  लक्ष वेधले . स्वामीजी त्यांच्या याच कृतीतून उदयास आले व संपूर्ण देश भ्रमंती करण्याचा निर्णय स्वामी विवेकानंदांनी घेतला.

       स्वामी विवेकानंद नेहमी म्हणत , कोणत्याही राष्ट्राचे भवितव्य हे त्या राष्ट्रातील युवा पिढीवरती अवलंबून असते. राष्ट्राची जडणघडण ही त्या देशातील युवाशक्तीच्या   प्रेरणेवरती अवलंबून असते. अशीच शक्ती मला राष्ट्रासाठी संघटित करायची आहे. हे स्वामीजींच्या मुखामध्ये सदैव उद्गार असत. अंगावरती भगवी वस्त्रे , डोक्यावरती फेटा घालून स्वामी विवेकानंदांनी भारतीय संस्कृती आणि भारतीय तत्त्वज्ञान लोकांच्या समोर मांडण्यासाठी जगभ्रमंती केली.

        शिकागोतील धर्म परिषदेमध्ये 11 सप्टेंबरला स्वामीजी ज्यावेळी शिकागो येथे धर्म परिषदेसाठी गेले होते. त्यावेळी स्वामीजींचा वेश पाहून सर्व लोक अचंबित  झाले होते.हा संन्याशी माणूस काय बोलणार, असा सर्व लोकांना प्रश्न पडला होता.स्वामीजी ज्यावेळी बोलायला उभे राहिले, सभागृहावरती चौफेर नजर फिरवल्यानंतर स्वामीजींनी आपल्या भाषणाची सुरुवात ' माझ्या बंधू आणि भगिनींनो'  या एकाच वाक्याने केली आणि सभागृहांमध्ये प्रचंड टाळ्या. एका भाषणाने सर्व लोकांना मंत्रमुग्ध केले आणि विवेकानंदांनी आपल्या हजारो शिष्यांची निर्मिती केली.पाश्चिमात्य संस्कृतीच्या विळख्यात अडकत असलेल्या भारतीय संस्कृतीला ,भारतीय जनतेला अचूक मार्गदर्शन करण्याचे कार्य स्वामीजींनी केले.

        सर्वधर्मसमभाव, संयम आणि शांततेचा मार्ग पत्करणारा महापुरुष महान,त्यागी देशभक्त ,महान तत्वज्ञ, बुद्धिजीवी व्यक्तिमत्व, प्रतिभा संपन्न असा वक्ता म्हणून स्वामीजींच्याकडे पाहिले जाते. जगभराची भ्रमंती करणाऱ्या  या महामानवाने वेगवेगळ्या  देशांमध्ये फ्रान्स, जर्मन ,अमेरिका व इंग्लंड या ठिकाणी गाजलेली त्यांची पाच भाषणे आजही प्रसिद्ध आहेत.

       'मातापित्यांबरोबरच मातृभूमीला ही महत्त्व देणारा एक महान योगी आणि एक ब्रह्मचारी' अशी ख्याती स्वामी विवेकानंद यांच्या बाबतीत पहावयास मिळते. अशा या महान विभूतीचा मृत्यू 4 जुलै 1902 रोजी झाला. आज ही कन्याकुमारी या ठिकाणी गेल्यानंतर स्वामीजींच्या कर्तृत्वाची ओळख होते.

       स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन हा 'युवक दिन' म्हणूनही साजरा केला जातो. तारुण्याचा उपयोग हा जनसामान्यांसाठी करायचा असतो. देश प्रेमाने व संस्कृतीच्या रक्षणासाठी प्रसार करणाऱ्या विभूतींमध्ये स्वामीजींचा समावेश होतो. आजच्या युवा पिढीने याच गोष्टींचा आदर्श घेण्याचे कार्य जर केले तर स्वामीजींच्या स्वप्नातील हा देश साकार होईल असे वाटते.

      कर्मकांडांना विरोध करून मानवतावादी विचार मांडणारा, समतेचा संदेश देणारा ,राष्ट्रप्रेमाची पताका खांद्यावरती घेऊन धर्मप्रसार करणारा एक महान विभूती म्हणून स्वामी विवेकानंद यांच्याकडे पाहिले जाते. याच तपस्वी, त्यागी वृत्तीचा, प्रगल्भ बुद्धिमत्ता असणाऱ्या युवकांचा आदर्श आजच्या युवा पिढीने त्यांची जयंती युवक दिन म्हणून साजरी करत असताना घेणे गरजेचे आहे.

 धन्यवाद !

नेताजी सुभाषचंद्र बोस Netaji Subhashchandra Bose

 



नेताजी सुभाषचंद्र बोस

 भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ज्या महापुरुषांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या सर्वांचीच आपल्याला मोठ्या प्रमाणात आठवण होत असताना पहावयास मिळते. देशाला स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर ब्रिटिशांच्या 'फोडा आणि झोडा'  पद्धतीला अगदी तशाच पद्धतीने उत्तर दिले पाहिजे, असे रोखठोकपणे प्रखर विचार मांडणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा  जन्म ओरिसा राज्यातील कटक या गावी 23 जानेवारी 1897 साली झाला. आपले महाविद्यालयीन शिक्षण कलकत्ता या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर ते विदेशात उच्च शिक्षणासाठी गेले. आयसीएस परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील परकीयांच्या सेवेत गुंतण्यापेक्षा स्वकीयांची  सेवा  कधीही चांगली,  ही भूमिका समोर ठेवून नेताजी सुभाषचंद्र बोस, गांधीजींच्या समवेत स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी झाले.  1923 मध्ये महात्मा गांधीजी व नेताजी यांच्यात वैचारिक मतभेद निर्माण झाले.  यातूनच नेताजींनी 'स्वराज्य पक्षात' प्रवेश केला.

     नेताजी आपल्या कृतीशील विचारांमुळे बंगाल नगरपालिकेचे कार्याधिकारी बनले. 1924 साली  नेताजींचे क्रांतिकारी विचार पाहून , त्यांना मिळणारा तरुणांचा प्रतिसाद पाहून ब्रिटिशांनी नेताजींना तुरुंगात धाडले. नेताजी 1938व 1939 या दोन्ही वेळा काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष बनले. पुन्हा 1939 साली आपल्याच विचारश्रेणीत 'फॉरवर्ड ब्लॉक' पक्षाची स्थापना केली.

         भारतात राहून ब्रिटिशांचा पराभव करता येणार नाही तर जागतिक अंदाज घेऊन ब्रिटिशांचा पाडाव करता येईल,  अशी नेताजींची ठाम भूमिका होती. नेताजी  1941 साली रशिया मार्गे जर्मनीला पोहोचले. परदेशात गेल्यानंतर नेताजींनी 'आझाद हिंद सेना' ही संघटना रासबिहारी बोस व कॅप्टन मोहनसिंग यांच्या मदतीने 1942 साली स्थापन केली. तसेच 1943 साली आझाद हिंद सेनेचे सेनापतीपद स्वीकारले. आपल्या सेनेत नुसते पुरुष असून चालणार नाहीत तर स्त्रियांचाही सहभाग असला पाहिजे यासाठी नेताजींनी आझाद हिंद सेनेत 'झाशीची राणी' रेजिमेंट ची सुरुवात केली आणि त्याचे नेतृत्व हे कॅप्टन लक्ष्मी सेहगल यांच्याकडे दिले. पारतंत्र्याच्या कालखंडातही स्त्री स्वातंत्र्याचा विचार करणारा क्रांतिकारक महापुरुष म्हणून नेतांजींकडे पाहिले जाते. सैन्याचे, प्रजेचे नेतृत्व करण्याची क्षमता पाहून जनतेने त्यांना 'नेताजी' ही पदवी बहाल केली.

     "तुम मुझे खून दो ! मै तुम्हे आझादी दूंगा!" या  एका वाक्यात काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, कलकत्त्यापासून सिंध पर्यंत लाखो तरुणांना  संघटित करण्याचे कार्य नेताजींनी केले.देशाला स्वातंत्र्य हे शांततेतून नाही तर क्रांतीच्या बळावरच मिळणार आहे, हे नेताजींना माहीत होते. नेताजींनी 'जय हिंद!'  आणि 'चलो दिल्लीचा'  नारा दिला. 1943 ला अंदमान निकोबार बेटे जिंकून त्यांचे नामकरण 'शहीद',  'स्वराज्य'  असे केले 1944 साली  आझाद हिंद सेनेने मॉवडॉक हे ठाणे जिंकून भारतीय भूमीतील पहिला विजय साजरा केला व थेट कोहिमा व इंफाळ पर्यंत धडक मारली. 1945 मध्ये 6 ऑगस्ट रोजी हिरोशिमा व 9 ऑगस्ट रोजी नागासाकी या जपान मधील शहरांवरती अणुबॉम्ब  टाकल्याने युद्धाची गती थंडावली गेली. आझाद हिंद सेनेचे कार्य हे अल्प प्रमाणात भारतात थोड्या पद्धतीत थंडावले गेले. देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी शिवनीतीचा वापर करत वेशांतर करून देशांतर करणारे एक क्रांतिकारी महापुरुष म्हणून नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याकडे पाहिले जाते. जपान, जर्मनी यांसारख्या देशांची मदत मिळवण्यासाठी ते यशस्वी झाले होते. त्याचबरोबर आपल्या समवेत क्रांतिकारी विचारांचे तरुण निर्माण करत होते. अशा या महान नेत्यावरती ब्रिटिशांनी वेगवेगळ्या पद्धतीचे खटले दाखल केले ,तुरुंगात डांबले पण नेताजींनी तुरुंगात असतानाही आमरण उपोषण केले. ब्रिटिशांना त्यांना तुरुंगातून सोडून द्यावे लागले .ज्यावेळी नेताजी घरी होते त्यावेळी त्यांना नजर कैदेत ठेवण्यात आले होते. अशा या महान महापुरुषाचा मृत्यू 18 ऑगस्ट 1945 रोजी टोकियोकडे जात असताना ताई पै येथे विमान अपघातात झाला.

    एक उत्तम प्रशासकीय अधिकारी ते स्वातंत्र्य सेनानी म्हणून भारतीय स्वातंत्र्यलढ्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे अग्रक्रमाने नाव घेतले जाते.भारतीय स्वातंत्र्य चळवळीत क्रांतिकारी विचारांची चळवळ अंमलात आणून शस्त्राच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न करणारा एक महान सेनानी म्हणून, नेताजींचे नाव घेतले जाते. परकीय सत्तेचा योग्य पद्धतीने संबंध ठेवून, राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी त्यांची मदत घेऊन स्वातंत्र्याचे गीत गाणारे व परकीय सत्तेला नेस्तनाबूत करणारा महान योद्धा म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा गौरव होतो.

    नेताजींच्या मृत्यूनंतर सुद्धा आझाद हिंद सेनेचे कार्य नेताजींच्या विचारांनी प्रभावी झालेल्या लाखो तरुणांनी प्रभावीपणे पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.नेताजींच्या मृत्यूनंतर त्यांच्या असंख्य समर्थकांवरती वेगवेगळ्या पद्धतीचे खटले दाखल केले गेले. पण या नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या समर्थकांच्या बचावा करता पंडित नेहरू, देसाई यांसारख्या नामवंत वकिलांनी वकिली केली. त्यांच्यावरती असणारे खटले रद्द करण्यासाठी प्रयत्न केले. आज याच महापुरुषांच्या विचारांचा आपण आदर्श घेऊया.

 जय हिंद ! जय भारत !


नेताजींविषयी उत्कृष्ट भाषण येथे पहा . 




December 22, 2022

प्रजासत्ताक दिन मराठी भाषण Republic Day Marathi Specch







आपला राष्ट्रीय सण - प्रजासत्ताक दिन 

दिवस हा सोन्याचा , 

तुमच्या माझ्या आनंदाचा ,

देशाच्या गौरवाचा ..... 

अभिमानाचा आणि उत्साहाचा ! 

दिवस हा आपुल्या न्यायाचा ...  , 

विजय असो

प्रजासत्ताक दिनाचा ! 

सन्माननीय व्यासपीठ , व्यासपीठावरील आदरणीय मान्यवर , वंदनीय गुरुवर्य  आणि माझ्या बालमित्रांनो , 

आज २६ जानेवारी - म्हणजेच आपला ' प्रजासत्ताक दिन '. आपल्या सर्वांच्या या आवडत्या राष्ट्रीय सणानिमित्त मी आपणांस काही चार शब्द सांगणार आहे , ते आपण शांतपणे ऐकून घ्यावेत अशी मी नम्रतापूर्वक विनंती करत आहे.

              आपण सर्वजण सन १९५० पासून हा दिवस 'प्रजासत्ताक दिन' किंवा ' गणराज्य दिवस' म्हणून साजरा करतो .भारत हे एक लोकशाही राष्ट्र आहे.म्हणजेच लोकांनी, लोकांच्यासाठी , लोकांकरवी चालवलेले राज्य आहे.



देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि आपण इंग्रजाच्या जुलमी राजवटीतून मुक्त झालो.स्वातंत्र्य , समता , बंधुता व न्याय देणारी राजकीय व्यवस्था सुरु झाली . यालाच आपण 'लोकशाही शासनव्यवस्था' असेही म्हणतो. 

   या सर्वांचा पाया होता ' भारतीय राज्यघटना'.भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला नवा आकार , नवी दिशा देणाऱ्या घटनेची निर्मिती करणे , हे देशासमोर मोठे आव्हान होते.शेवटी ही जबाबदारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सोपवण्यात आली आणि त्यांनी ती लिलया पेलली.त्यामुळे सर्व जगात श्रेष्ठ आणि आदर्श म्हणून ओळखली जाणारी 'भारतीय राज्यघटना' आकारास आली.त्यांच्या या महान कार्याबद्दल त्यांना ' भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार' असे म्हणतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर , डॉ.राजेन्द्रप्रसाद , यासारख्या अनेक महनीय व्यक्तींचे घटनानिर्मितीत मोलाचे कार्य आहे. 

 २६ नोव्हेंबर १९४९ ला भारतीय राज्यघटनेचा स्वीकार करणेत आला आणि २६ जानेवारी १९५० पासून हे संविधान संपूर्णपणे लागू करण्यात आले.साऱ्या देशाने अन्यायाची,गुलामगिरीची कात टाकली आणि भारतभूमीत स्वातंत्र्य , समता , न्याय व बंधुता या लोकशाहीच्या सोनेरी पानांचा उदय झाला.म्हणूनच स्वातंत्र्यदिनाप्रमाणेच हा दिवसही आपणा सर्वांसाठी आनंदाचा , आदराचा ,उत्साहाचा व त्यागाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. 

   याच दिवशी आपल्या पवित्र भारतभूमीवर एका नव्या युगाचा प्रारंभ झाला.प्रत्येक मानवास सन्मानाने जगण्याचे, उंच भरारी घेण्याचे बळ या घटनेने दिले.म्हणूनच आपण हा दिवस आनंदाने व उत्साहाने साजरा करत आहोत व करत राहणार ! 

    या मंगलदिनी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो .त्याचबरोबर देशासाठी बलिदान दिलेल्या व सर्वस्व अर्पण केलेल्या सर्व थोर व्यक्तींना याप्रसंगी वंदन करून मी माझे दोन शब्द संपवतो ! 

जय हिंद ! जय भारत ! 









December 9, 2022

इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा सराव संच 01 7TH STANDARD TALENT SEARCH EXAM GUESS PAPER 01

 



सर्व चाचण्या सोडवण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा. 





नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, 

आज आपण पाहणार आहोत इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा सराव पेपर .आपल्याला ही सराव मालिका नक्की आवडेल .आपण या चाचण्या आपली शाळा, वर्गमित्र यांना नक्की पाठवा. भरपूर सराव करा व यशस्वी व्हा ! 


अधिक सरावासाठी YOUTUBE वरील व्हिडिओ येथे पाहा.






 सातवी प्रज्ञाशोध परीक्षा सराव संच 01

  7TH STANDARD TALENT SEARCH 

   EXAM GUESS PAPER 01


December 7, 2022

चौथी प्रज्ञाशोध परीक्षा सराव चाचणी 09 4TH STANDARD TALENT SEARCH GUESS PAPER

 


























YOUTUBE वरील व्हिडिओ येथे पहा .





चौथी प्रज्ञाशोध परीक्षा सराव संच - 09 









December 6, 2022

चौथी प्रज्ञाशोध परीक्षा सराव चाचणी 08 4TH STANDARD TALENT SEARCH EXAM GUESS PAPER 08

 


इयत्ता चौथी प्रज्ञा शोध परीक्षा यापूर्वीच्या सर्व  चाचण्या सोडवण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा .



YOUTUBE वरील व्हिडिओ पहा .




चौथी प्रज्ञाशोध परीक्षा सराव चाचणी येथे सोडवा .


December 1, 2022

चौथी प्रज्ञाशोध परीक्षा सराव संच 07 4th Standard Talent Search Exam Guess Paper



चौथी प्रज्ञाशोध परीक्षा 

सराव  संच - 07 


नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, 

आज आपणांस इयत्ता चौथी प्रज्ञाशोध परीक्षा विविध घटकावर आधारित Online Tests  सोडवायला मिळणार आहेत. आपण सरावासाठी त्या नक्की सोडवा व आपल्या मित्रांना Share करा.


यापूर्वीचे सराव संच येथे सोडवा .

चौथी प्रज्ञाशोध परीक्षा ऑनलाईन टेस्ट 01



चौथी प्रज्ञाशोध परीक्षा ऑनलाईन टेस्ट 02


चौथी प्रज्ञाशोध परीक्षा ऑनलाईन टेस्ट 03


चौथी प्रज्ञाशोध परीक्षा ऑनलाईन टेस्ट- 04


चौथी प्रज्ञाशोध परीक्षा ऑनलाईन टेस्ट - 05 







इयत्ता चौथी प्रज्ञाशोध परीक्षा सराव संच - 07 येथे सोडवा. 


November 30, 2022

समानार्थी शब्द Samanarthi Shabd

 



समानार्थी शब्द

तलाव = कासार ,सारस ,तटाक ,तळे .

ढीग = रास.

ढग = मेघ ,जलद ,अभ्र ,अंबुद ,पयोध .

डोळे = चक्षू ,अक्ष ,नयन ,नेत्र ,लोचन

डोंगर = पर्वत.

घोडा = हय ,अश्व ,तुरग ,वारू.

घर  = सदन ,गृह ,निवास ,भवन ,गेह ,आलय ,निकेतन.

गंध = वास ,परिमळ .

गौरव = सत्कार .

गोष्ट  = कथा ,कहाणी .

नेता = नायक , पुढारी .

नीच  = तुच्छ ,अधम ,चांडाळ .

निर्मळ = स्वच्छ .

निर्झर  = झरा .

निर्जन  = ओसाड .

अविरत  = सतत ,अखंड .

अवर्षण  = दुष्काळ ( पाऊस न पडणे ).

अवचित  = एकदम , अचानक .

अमृत  = पीयूष ,सुधा ,संजीवनी .

अपाय  = त्रास ,इजा .

कपाळ  = ललाट ,भाळ ,मस्तक.

कमळ  = पंकज ,अंबुज ,राजीव ,पुष्कर ,पद्म ,सरोज ,कुमुदिनी .

कनक  = सोने ,कांचन ,हेम  .

कठोर = निर्दय ,निष्ठुर .





                               4444

कटी  = कंबर .

आज्ञा  = आदेश ,हुकूम .

आश्चर्य   = नवल ,अचंबा .

आंनद    = हर्ष , मोद ,तोष ,आमोद .

आयुष्य   =  जीवन  .

आरसा   = दर्पण .

एकजूट  = एकी ,ऐक्य ,एकता.

उर्जा  = शक्ती .

उपद्रव  = त्रास ,छळ .

उत्कर्ष  = भरभराट .

उदास  = खिन्न ,दुःखी .

चांदणे  = कौमुदी ,ज्योत्स्ना ,चंद्रिका .

चंद्र   = रजनीनाथ ,शशांक ,शशी ,सोम ,निशानाथ,इंदू ,सुधांशू ,सुधाकर .

चौफेर  = चहूकडे ,सर्वत्र ,भोवताली.

चेहरा  = तोंड ,मुख ,वदन ,आनन.

गणपती  = गजानन ,विनायक ,लंबोदर ,एकदंत ,गौरीसुत,प्रथमेश ,गणनायक ,

गणराज , अमेय ,गजवदन ,गौरीनंदन ,विघ्नहर्ता .

ग्रंथ   = पुस्तक .

गवई   = गायक .

पंक = चिखल.

पोपट = राघू , रावा ,शुक ,कीर .

पान = पर्ण ,पत्र ,पल्लव.

पारंगत = निपुण ,तरबेज .

पाणी = जल ,पय ,उदक , वारी ,नीर ,सलील ,जीवन .

अचल  = स्थिर ,शांत ,पर्वत .

अत्याचार   = अन्याय , जुलूम .

अग्नी  = पावक ,आग ,अनल ,वन्ही ,विस्तव .

अपराध  = गुन्हा.

अभिनेता   = नट.

आसक्ती = लोभ ,हव्यास .

आस  = इच्छा ,मनीषा.

आसन   = बैठक .

आपत्ती   = संकट.

आकाश  = गगन ,नभ ,अंबर ,व्योम ,खग ,आभाळ.

आई   = माता ,जननी ,माउली ,माय ,जन्मदात्री

अंहकार  = गर्व ,घमेंड

अरण्य  = आर्ण ,वन ,कानन ,विपिन ,जंगल.

अनर्थ  = अरिष्ट ,संकट.

तिमिर = अंधार ,काळोख .

तारू = जहाज ,गलबत.

तारे = तारका ,चांदण्या ,नक्षत्रे

तरू = वृक्ष ,झाड .

तरुण = जवान ,युवक.

किल्ला = गड , तट ,दुर्ग

काष्ठ  = लाकूड .

कावळा  = काक ,एकाक्ष ,वायस .

कान  = कर्ण ,श्रवण ,श्रोत्र .

काठ  = तीर ,किनारा ,तट.

थवा = समुदाय ,घोळका ,गट ,चमू ,जमाव .

थंड   = शीत ,गार ,शितल.

तुरुंग = कारागृह ,कैदखाना ,बंदीखाना .

तृण  = गवत.

तृषा = तहान ,लालसा.

उदर  = पोट.

उपवन  = बगीचा ,बाग ,उद्यान ,वाटिका.

उणीव  = कमतरता ,न्यून ,न्यूनता.

इंद्र  =   सुरेंद्र ,देवेंद्र.

इशारा  = सूचना , खूण.

महिमा = थोरवी ,मोठेपणा ,महात्म्य.

भेकड = भित्रा ,भ्याड ,भीरु

भेद = फरक ,भिन्नता.

भू = जमीन , धरा ,भूमी ,धरणी ,धरित्री.

भुंगा = भ्रमर ,भृंग ,अलि ,मिलिंद.

भाऊबंद = नातेवाईक ,आप्त ,सगेसोयरे.

भान = शुद्ध ,जागृती.

भार = ओझे.

भरवसा = विश्वास ,खात्री.

भगिनी = बहिण.

इहलोक  = मृत्युलोक.

अंतरिक्ष    = अवकाश.

अंत    = शेवट ,अखेर.

अंगार    =  निखारा.

अंग    = शेवट ,अखेर

दुनिया = जग.

दुजा = दुसरा.

दीन  = गरीब.

दिन  = दिवस.

दागिना = अलंकार ,भूषण.

दानव = राक्षस ,दैत्य ,असुर.

दारा  = बायको ,पत्नी.

दास   = चाकर ,नोकर.

दंडवत  = नमस्कार.

दंत   = दात.

धवल  = शुभ्र , पांढरे.

दैन्य = दारिद्र्य.

देव  = सुर ,ईश्वर ,ईश.

दुर्धर = कठीण ,गहन.

दुर्दशा = दुरवस्था ,दुःस्थिती.

जयघोष = जयजयकार.

जरा = म्हातारपण.

छिद्र = भोक.

छंद  = नाद ,आवड.

छडा   = शोध ,तपास.

ख्याती  = प्रसिद्धी ,कीर्ती

खड्ग   = तलवार.

खंत = खेद , दुःख.

खग = पक्षी,विहग ,अंडज ,द्विज.

खटाटोप = प्रयत्न ,मेहनत ,धडपड.

ब्रीद = बाणा ,प्रतिज्ञा

बंधू   = भाऊ ,भ्राता.

बंधन = निर्बंध ,मर्यादा.

बैल  = वृषभ ,पोळ,खोंड.

बेढब  =  बेडौल.

बांधेसूद  = रेखीव ,सुडौल

बाप = वडील ,पिता ,जनक ,जन्मदाता ,तात.

बक  = बगळा.

बहर = हंगाम ,सुगी.

फूल  = पुष्प ,सुमन ,कुसुम ,सुम.

नारळ = श्रीफळ ,नारिकेल.

नाथ  = धनी ,स्वामी.

नृप  = राजा ,भूप ,भूपती ,भूपाळ ,नरेश ,महिपती.

नदी = सरिता ,तटिनी ,जीवनदायिनी.

नजराणा  = भेट ,उपहार.

परिमल = सुवास ,सुगंध.

पर्वत = नग ,अद्री ,गिरी ,अचल ,शैल.

पती   = नवरा ,भ्रतार.

पशू  = प्राणी ,जनावर ,श्वापद.

नौदल =  आरमार.

स्तुती = प्रशंसा , कौतुक.

स्वच्छ = नीटनेटका , निर्मळ , साफ.

संहार = नाश , विनाश ,सर्वनाश ,विध्वंस.

साप = सर्प , भुजंग , अही.

समय = वेळ.

नगर  = शहर ,पूर ,पुरी.

धन  = पैसा ,संपत्ती ,द्रव्य ,वित्त ,संपदा.

धनुष्य  = चाप , कोदंड ,धनू ,तीरकमठा.

धरती  = धरणी ,पृथ्वी ,वसुंधरा ,वसुधा ,मही ,भूमी ,क्षोणी ,धरित्री ,अवनी ,रसा.

डोके = मस्तक ,शीर ,माथा.

ठेकेदार = कंत्राटदार ,मक्तेदार.

ठक = लबाड.

ठग = लुटारू.

ठसा = खूण.

खडक  = मोठा दगड ,पाषाण.

कृश  = हडकुळा.

कृपण = कंजूष ,चिकू.

कुटी  = झोपडी.

किमया  = जादू , चमत्कार.

प्रपंच = संसार.

प्रजा = लोक ,रयत ,जनता.

प्रकाश = उजेड ,तेज.

पंडित = शास्त्री ,विद्वान ,बुद्धिमान.

पंक्ती = रांग , ओळ ,पंगत.

मयूर = मोर.

मंदिर = देऊळ ,देवालय.

मलूल = निस्तेज.

मकरंद = मध.

मनसुबा = बेत , विचार.

विमल = निष्कलंक , निर्मळ.

विलंब = उशीर.

वायदा = करार.

वाली = रक्षणकर्ता , कैवारी.

वासना = इच्छा.

यातना = दुःख , वेदना.

याचक = भिकारी.

मंगल = पवित्र.

मौज = मजा ,गंमत.

मोहिनी = भुरळ.

वर = नवरा , पती ,भ्रतार.

वत्स = वासरू , बालक.

वचक = धाक , दरारा.

वर्षा = पाऊस ,पावसाळा.

वंदन = नमस्कार ,प्रणाम ,नमन ,अभिवादन ,प्रणिपात.

यातना = दुःख , वेदना.

याचक = भिकारी.

मंगल = पवित्र.

मौज = मजा ,गंमत.

मोहिनी = भुरळ.

वर = नवरा , पती ,भ्रतार.

वत्स = वासरू , बालक.

वचक = धाक , दरारा.

वर्षा = पाऊस ,पावसाळा.

वंदन = नमस्कार ,प्रणाम ,नमन ,अभिवादन ,प्रणिपात.

टंचाई = कमतरता.

झोका = हिंदोळा.

झेंडा = ध्वज ,निशाण ,पताका.

झुंज = लढा ,संग्राम ,संघर्ष.

झुंबड = गर्दी ,रीघ ,थवा.

सुंदर = सुरेख , छान , देखणे.

सुरेल = सुश्राव्य.

सुगम = सुलभ , सोपा ,सुकर.

साथ  = सोबत ,संगत.

साधू  = संन्यासी.

झाड = वृक्ष ,तरू.

ज्येष्ठ  = मोठा ,वरिष्ठ.

जीर्ण = जुने.

जिव्हाळा = माया ,प्रेम ,ममता.

जिन्नस = पदार्थ.

लावण्य = सौंदर्य.

लाडका = आवडता.

लाज = शरम , भीड.

लढा = लढाई , संघर्ष.

रंक = गरीब.

संदेश = निरोप.

संशोधक = शास्त्रज्ञ.

संघ = फौज ,दल.

सेवक = दास , नोकर.

सीमा = वेस ,मर्यादा ,शीव.

गाय = धेनू ,गो ,गोमाता.

गाणे = गीत.

गृहिणी  = घरधनीण.

गरुड = खगेंद्र ,द्विजराज ,वैनतेय.

गनीम  = अरी ,शत्रू.

मित्र = दोस्त ,सवंगडी ,साथीदार ,सोबती ,स्नेही.

मत्सर = द्वेष ,असूया.

मासा = मीन , मत्स्य.

मानव = मनुष्य ,माणूस ,नर ,मनुज.

मार्ग = रस्ता ,वाट ,पथ ,सडक.

व्यथा = दुःख.

वेश = पोशाख.

वीज = चपला ,चंचला ,तडिता ,बिजली ,सौदामिनी ,विद्युत ,विद्युलता.

विषण्ण  = खिन्न , कष्टी.

विलग = सुटे ,अलग.

कट  = कारस्थान.

करमणूक  = मनोरंजन.

कष्ट  = श्रम ,मेहनत

औक्षण  = ओवाळणे.

ऐश्वर्य  = श्रीमंती ,वैभव.

हिंमत = धैर्य ,धाडस.

हिम = बर्फ.

हात = कर , हस्त , पाणि , भुजा ,बाहू.

हत्ती = गज , कुंजर.

हरिण = मृग , सारंग , कुरंग.

हिंमत = धैर्य ,धाडस.

हिम = बर्फ.

हात = कर , हस्त , पाणि , भुजा ,बाहू.

हत्ती = गज , कुंजर.

हरिण = मृग , सारंग , कुरंग.

हताश = निराश.

स्त्री = महिला , वनिता , नारी ,ललना.

सिंह = वनराज , केसरी , मृगेंद्र.

संशय = शंका.

संग्राम = युद्ध , समर , संगर , लढाई.

प्रेम = माया ,लोभ ,स्नेह.

प्रातःकाळ = सकाळ ,उषा ,पहाट.

प्राचीन = पूर्वीचा ,पुरातन ,जुनाट.

प्रताप = पराक्रम ,शौर्य.

प्रतीक = चिन्ह ,खूण.

रोष = राग.

रुक्ष = कोरडे , नीरस.

रात्र = रजनी , यामिनी ,निशा , रात.

युवती = तरुणी.

यान = अंतराळवाहन.

समुद्र = सागर , सिंधू , रत्नाकर ,जलधि ,पयोधी , जलनिधी.

समाधान =  आनंद ,संतोष.

सज्जन = संत.

शिकस्त = पराकाष्टा.

शीण = थकवा.

क्षय = झीज ,ऱ्हास.

क्षमा = माफी.

क्षत = जखम ,व्रण , इजा.

होडी = नाव , नौका , तर.

हुशार = चतुर ,चाणाक्ष.

सूर्य = रवी , भास्कर , भानू ,आदित्य ,दिनकर ,दिनमणी .

सविता ,वासरमणी ,मार्तंड ,मित्र.

स्वेद = घाम ,घर्म.

स्वामी = धनी ,मालक.

संकल्प = बेत , मनसुबा.

वारा = वायू ,वात ,अनिल , मरुत ,पवन ,समीर.

वत्स = वासरू , बालक.

वचक = धाक , दरारा.

वर्षा = पाऊस ,पावसाळा.

वंदन = नमस्कार ,प्रणाम ,नमन ,अभिवादन ,प्रणिपात.

शीघ्र = जलद.

शिक्षक = गुरुजी , गुरु , मास्तर.

शिकारी = पारधी.

शेज = बिछाना , अंथरूण , शय्या.

शत्रू = अरी , रिपू , वैरी.

विस्मय = आश्चर्य , नवल.

विस्तृत = विशाल , विस्तीर्ण.

विनय = नम्रता.

विद्रूप = कुरूप.

विवंचना = काळजी ,चिंता.

शर = बाण , तीर ,सायक.

शक्ती = बळ , जोर , ताकद ,सामर्थ्य , ऊर्जा.

शव = प्रेत.

व्याकूळ = दुःखी , कासावीस.

व्रण = खूण , क्षत.

क्षोभ = क्रोध.

क्षेम =  कल्याण ,हित ,कुशल.

क्षुधा = भूक.

क्षीर =  दूध.

क्षीण = अशक्त.