October 17, 2022

तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यात ताक का ठेवत नाहीत ?



जिज्ञासा - 

तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यात ताक का ठेवत नाहीत ?

तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यात ताक ठेवल्यास ताकातील लॅक्टिक आम्लाची तांबे व पितळ या धातूंवर अभिक्रिया होते आणि त्यापासून विषारी क्षार बनतात.हे विषारी क्षार ताकात मिसळतात व ताक कळकते म्हणून तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यात ताक ठेवत नाहीत .तांबे -पितळ धातूंवर आम्लाची क्रिया होऊ नये म्हणून अशा भांड्यांवर कथलाचा थर देतात.म्हणजेच कल्हही करतात.कथलावर जरी आम्लाची अभिक्रिया झाली तरी त्यापासून बनलेले क्षार विषारी नसतात.