October 11, 2022

पावसाचे पाणी बेचव का लागते ?

 जिज्ञासा 

पावसाचे पाणी बेचव का लागते ?

पावसाचे पाणी हे उर्ध्वपातीत पाणी असते .म्हणजेच ते ढगातून खाली येते.सूर्याच्या प्रखर उष्णतेने भूजलाचे बाष्पीभवन होते.बाष्पीभवन होताच पाण्यातील क्षार हे जमिनीवरच राहतात व फक्त शुद्ध पाणी बाष्परुपात हवेत जाते.हवेतील या बाष्पाचेच संद्रीभावन होऊन मगच पाऊस पडतो.हवेतून जेव्हा या  पाण्याचे थेंब खाली येतात ,तेव्हा खाली येताना त्यात कार्बन डायऑक्साईड विरघळतो परंतु त्याचे प्रमाण अगदीच अल्प असते.त्यामुळे पावसाचे पाणी हे जवळपास क्षारविरहित शुद्ध पाणी असते व त्याला चव नसते.