July 27, 2023

15 August मराठी भाषण आपला स्वातंत्र्य दिन


स्वातंत्र्य दिवस मराठी भाषण

15 ऑगस्ट मराठी भाषण




 अध्यक्ष महाशय ,गुरुजन वर्ग,  उपस्थित पालक वर्ग आणि माझ्या बाल मित्रांनो,

 आज आपल्या आनंदाचा दिवस .उत्साहाचा दिवस आहे. 15 ऑगस्ट म्हणजे आपला स्वातंत्र्य दिन. भारताचे समाज क्रांतीचा आणि क्रांतिकारकांच्या बलिदानाचा. त्यांच्या कर्तृत्वाचा विजय म्हणजे स्वातंत्र्य दिन. 150 वर्षे इंग्रजांच्या जुलूमशाहीतून मुक्त झालेल्या भारताचा हा स्वातंत्र्य दिन.

          मित्रहो,आज आपण अतिशय सुस्थितीत आणि सुरक्षित आहोत.तो पारतंत्र्याचा काळ आठवून पहा.कसे जगले असतील हे लोक? कसा सहन केला असेल त्यांनी इंग्रजांचा अत्याचार ?अहो नुसते आठवले तरी अंगावर शहारे येतात.व्यापारी म्हणून आलेल्या या गोऱ्यांनी आपल्या भारतात बस्तान बसवले.हळूहळू आपले हातपाय पसरायला सुरुवात केली. आपल्या भोळ्याभाबड्या ,काही अंशी अडाणी जनतेवर त्यांनी हुकूमत गाजवणे सुरू केले.

    पाहता पाहता त्यांनी सर्व देश व्यापला आणि राज्यकर्ते बनले. 'ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी 'अशा पद्धतीने त्यांनी भारतीय जनतेला गुलाम बनविण्याचा चंगच बांधला. अनेक व्यवसाय सुरू केले. भारतीय जनतेला नोकरी देऊन त्यांच्यावर हुकूमत दाखवून कसलीही कामे इंग्रज सरकार करून घेऊ लागले.

    हळूहळू जनतेच्या लक्षात येऊ लागले. ब्रिटिशांच्या गुलामगिरीचा वीट येऊ लागला होता आणि अशातच क्रांतीच्या ज्वाला भारतीय तरुणांच्या रक्तात भडकू लागल्या. भगतसिंग,राजगुरू,सुभाषचंद्र बोस,वासुदेव बळवंत फडके अशा अनेक धुरंधरांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले.अहिंसेचा मार्ग स्वीकारत महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह अनेक नेत्यांनी ब्रिटिशांच्या हुकूमशाहीचा निषेध करत अनेक आंदोलने केली, सत्याग्रह केले. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच"  असे विश्वासपूर्ण उद्गार काढत भारतीयांना स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून देत इंग्रजी सत्तेला त्यांचे डोके ठिकाणावर आहे का? असे परखडपणे विचारत लोकमान्य टिळकांनी इंग्रजा विरुद्धची आपली चळवळ बळकट केली.

      "तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा l " असे भावनिक आवाहन भारतीयांना करत सुभाष बाबूंनी 'आझाद हिंद सेना ' नावाची सशस्त्र क्रांतीची बलाढ्य फौज गोऱ्या इंग्रजा विरुद्ध उभी केली. कोणत्या ना कोणत्या मार्गाने स्वातंत्र्य हे मिळवावयाचेच,असा चंग प्रत्येक नेत्यांनं मनाशी बांधला होता. प्राण गेला तरी बेहत्तर, पण माझ्या मायभूमीला मी पारतंत्र्याच्या बेडीतून मुक्त करणारच, अशी क्रांतीची चळवळ भक्कम करत असताना इंग्रजांनी आपल्या नेत्यांवरही अनेक प्रकारचे अत्याचार केले.

       कुणाला काळ्यापाण्याची शिक्षा दिली, कुणाला जन्मठेप तर कुणाला चक्क फाशीला दिले! अशा क्रूर,दुष्ट इंग्रजांचा नायनाट व्हावा म्हणून त्यांनी ते सहनही केले. वि.दा. सावरकर,लाला लजपतराय,सरदार वल्लभ भाई पटेल,महात्मा ज्योतिबा फुले,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,गोपाळ कृष्ण गोखले, आगरकर अशा अनेक नेत्यांनी समाज क्रांतीसाठी आणि देश हितासाठी आपले आयुष्य खर्च केले. अनेकांच्या बलिदानाने, अनेक नेत्यांच्या कर्तृत्वाने भारत देश 15 ऑगस्ट 1947 साली स्वतंत्र झाला आणि आपण जुलमी इंग्रजांच्या राजवटीतून मुक्त झालो.

      आता आपण मुक्तपणे जगायला सिद्ध झालो.मित्रहो स्वातंत्र्याच्या वेडाने झपाटलेले त्यावेळचे नेते, त्यांचे चरित्र वाचले तरी अंगावर रोमांच उठतात. रक्त सळसळते आणि आताच्या राजकारणी नेत्यांचे घोटाळ्यांचे पराक्रम पाहिले तर वाटते की, खरंच आपला देश स्वतंत्र झाला आहे काय? मित्रहो,आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन माझे भाषण येथेच थांबवतो.

 जय हिंद! जय भारत!








July 9, 2023

Lokmanya Tilak Marathi लोकमान्य टिळक मराठी भाषण

लोकमान्य टिळक मराठी भाषण

Lokmanya Tilak Marathi Speech 




 "नेतृत्व ते जहाल ते लोकमान्य होते, 

समृद्ध लेखणीची जळती मशाल होते,

परकीय बंदीवास शापीत देश होता ,

पण आग केसरीचा एकेक लेख होता,

 त्या सिंहगर्जनेने जागा समाज झाला,

उदयास भारतात  स्वातंत्र्यसूर्य आला......!"

        सूर्याप्रमाणे तेज दिसणारेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शितल छाया देणारे परीक्षक, गुरुजन वर्ग आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या बालमित्र आणि मैत्रिणींनो...

           भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव 'बाळ गंगाधर टिळक ' असे होते. त्यांचे नाव केशव असे होते. पण सर्वजण त्यांना लाडाने 'बाळ' असे म्हणत. टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला.

     लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि तल्लख असलेल्या टिळकांचे गणित आणि संस्कृत हे आवडीचे विषय होते. 'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात' या युक्तीप्रमाणे लहानपणापासूनच या तेजस्वी सूर्याचे तेज चमकू लागले आणि या तेजात सर्वांचेच डोळे दिपून जाऊ लागले. टिळकांचे गणितातील प्राविण्य  तर वाखाणण्याजोगे होते . एकदा गुरुची वर्गात गणित शिकवत होते. सर्व मुलांनी गुरुजींनी दिलेली उदाहरणे वहीत लिहून सोडवायला सुरुवात केली. टिळकांनी मात्र एकही उदाहरण वहीमध्ये लिहिले नव्हते. गुरुजींनी टिळकांना याबद्दल विचारलेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेे असता वहीमध्ये न लिहिता टिळकांनी सर्व उदाहरणे अचूक उत्तरासहित  व योग्य क्रमाने अचूक सांगितली. टिळकांची ही कुशाग्र बुद्धी व  स्मरणशक्ती पाहून गुरुजींना सुद्धा खूप आश्चर्य वाटले.

           टिळकांना बालपणापासूनच अन्यायाविरुद्ध प्रचंड चिड होती. त्यांची बंडखोर वृत्ती आणि कणखर बाणा लहानपणापासूनच दिसत होता.

         एकदा टिळक वर्गात बसलेले असताना, त्यांच्या शेजारच्या बाकावरील मुलांनी शेंगा खाऊन टरफलं टिळकांच्या बाकाखाली टाकली. गुरुजी वर्गात आल्यावर त्यांनी टिळकांना उभे केले आणि त्यांना ओरडून बाकाखालील टरफलं उचलण्यास सांगितले.  तेव्हा टिळक अतिशय ठामपणे म्हणाले की, " मी शेंगा खाल्ल्या नाही मी टरफलं उचलणार नाही. " आणि त्यांनी टरफले उचलण्यास साफ नकार दिला. किती हे धाडस! किती ही हिम्मत! आणि  किती ही अन्यायाविरुद्ध चीड! पुढे याच वृत्तीने टिळकांना शांत बसू दिले नाही. याच वृत्तीने त्यांना संघर्ष शिकवला. इंग्रज सरकारच्या अन्या्या्विरुद्ध बंड पुकारण्यासाठी!

        लहानपणापासूनच त्यांना उत्साही आणि उत्कट राष्ट्रवादी  आणि क्रांतिकारी कार्यात भाग घेण्याची खूप आवड होती. वयाच्या सोळाव्या वर्षी टिळक मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढे त्यांनी बी.ए. व एल. एल. बी. ची परीक्षाही उत्तीर्ण केली. इसवी सन 1880 मध्ये त्यांनी गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली आणि 1885 मध्ये त्यांनी फर्ग्युसन कॉलेज सुरू केले.

          टिळकांनी लोक जागृतीसाठी 'मराठा' व 'केसरी' ही वृत्तपत्रे सुरु केली. त्याचबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती हे उत्सव सुरू केले. लोकांनी एकत्र यावे आणि त्यांच्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण व्हावी हा त्यामागील उद्देश होता. 1896 मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता. टिळकांनी शेतकऱ्यांना  संघटित होण्याचे आवाहन केले. त्यांच्या हक्काबद्दल जागृत केले आणि केसरी वर्तमानपत्रातून त्यांनी सरकारला त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली. 1897 पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीच्या काळात टिळकांची भूमिका  महत्त्वपूर्ण ठरली. भारतीय समाजाचा नाश करण्यासाठी इंग्रजांनी केलेलेेेेेे अत्याचार पाहिल्यानंतर टिळकांंनी आपले संपूर्ण जीवन भारत आणि भारतीय जनतेला ब्रिटिशांच्या जुलमी राजवटी पासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी समर्पित केले. टिळकांच्या सिंहगर्जनेनेेेेेेेेेेेेेेे संपूर्ण इंग्रज सरकार हादरुन जात असे. टिळकांनी संपूर्ण स्वराज्य घेण्याचा निर्धार केला होता. त्यांच्या नेतृत्वाच्या अनोख्या शैलीमुळे त्यांना जनमानसात लोकप्रिय केले. इंग्रजांमध्ये तर त्यांची भीतीच पसरली होती. त्यांना ब्रिटिश सरकारने 'भारतीय असंतोषाचेेेेेेेेे जनक' असे संबोधले.

         "या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" "उजाडले पण सूर्य कुठे आहे?" "राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे!" अशा अग्रलेखांमधून त्यांनी इंग्रज सत्तेवर घणाघात केला.

   "कितीही संकटे आली, आभाळ जरी कोसळले तरी, त्यावर पाय ठेवून उभा राहील मी", असे ते म्हणत.

     स्वातंत्र्यप्राप्तीसाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. 'देश कार्य म्हणजे देवकार्य' हा विचार त्यांनी भारतीय समाजामध्ये रुजवला आणि इंग्रजांना सळो की पळो करून सोडले .

      भारत मातेच्या या अनमोल रत्नाचे 1 ऑगस्ट 1920 रोजी आजारपणामुळे निधन झाले. भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करणारे असे थोर व्यक्तिमत्व आपल्याला लाभले, याचा मला फार अभिमान आहे. शेवटी मी एवढेच म्हणेन.....

 "पदोपदी पसरून निखारे आपल्याच हाती,

 होऊनिया बेभान धावले भारत मातेसाठी,

 कधी न थांबले विश्रांतीस्तव,पाहिले न मागे,

 संघर्षातून विणले त्यांनी स्वातंत्र्याचे धागे."

धन्यवाद!


 






July 6, 2023

इयत्ता तिसरी अभ्यासक्रमावर आधारित जोडशब्द

इयत्ता तिसरी अभ्यासक्रमावर आधारित जोडशब्द

प्रज्ञाशोध परीक्षेकरिता उपयुक्त 

अर्धामुर्धा

अक्राळविक्राळ

आडवातिडवा

अळमटळम

 कागदपत्र 

औरसचौरस

 ऐषआराम

एकटादुकटा

कडेकपारी

चारापाणी

चुपचाप

जिवजंतू

सटरफटर

ध्यानीमनी

पालापाचोळा

देवघेव

मालमसाला

उघडाबोडका

कानाकोपरा

खाडाखोड

चीजवस्तू

दयामाया

टक्केटोणपे

सोनेनाणे

आगतस्वागत

रानोरानी

अवतीभवती

अधून मधून

आसपास

कावराबावरा

कामकाज

काळासावळा

गडकिल्ले

गुरेढोरे

दगाफटका

जेवणखाण

ठाकठीक

तारतम्य

पैसाअडका

बागबगीचा

मुलेबाळे

कर्तासावरता

काबाडकष्ट

गोडधोड

जवळपास

दागदागिने

धनदौलत

नोकरचाकर

आंबटचिंबट

आरडाओरडा

आडपडदा

अचकटविचकट

अक्कलहुशारी

ओढाताण

इडापिडा

उच्चनीच

खेडोपाडी

गोळाबेरीज

जाळपोळ

झाडेझूडपे

साधासुधा

स्थिरस्थावर

थांगपत्ता

भीडभाड

मंत्रतंत्र

अंगतपंगत

कोर्टकचेरी

चिठ्ठीचपाटी

वाडवडील

दिवाबत्ती

डागडुजी

तिखटमीठ

हळदकुंकू

बापलेक

मायमाऊली

उपासतापास

कुजबूज

गाठभेट

जाडाभरडा

झाडझाडोरा

साधाभोळा

चोळामोळा

शेतीवाडी

देवाणघेवाण

सोयरेधायरे

त्रेधातिरपिट

बेलभांडार

मोलमजुरी

खेडीपाडी

दाणावैरण

अमीरउमराव

पैपैसा

सरसकट

धनदौलत

व्यापारउदीम

शिक्कामोर्तब

चिरीमिरी

पानसुपारी

शेठसावकार

काळवेळ

पिवळाधमक

पैसाअडका

जवळपास

नदीनाले

 हाल हवाल

 भाजीपाला

 मेवा मिठाई

 कामधंदा

 गणगोत

 घरदार

 शेतीभाती

 सदा सर्वदा

 धागा दोरा

 जडीबुटी

 दानधर्म

 टंगळ मंगळ

 पाटपाणी

 हावभाव

भोळाभाबडा

रोखठोक

मंत्रतंत्र

दानापाणी

जीर्णशीर्ण

पैपाहुणा

दंगाधोपा

पाचपोच

धरबंद

वरणभात

मायलेक

सुखशांती

दुधदुभते

गाडगेमडके

चंबूगबाळे

जडीबुटी

ऊठबैस

साधाभोळा

चोळामोळा

भांडणतंटा

रामरगाडा

किडूकमिडूक

गाजावाजा

जमीनजुमला

सगेसोयरे

धक्काबुक्की

तडकाफडकी

शेजारीपाजारी

संगतसोबत

धनधान्य

तोडफोड

फौजफाटा

मारपीट

रीतीरिवाज

पोरेसोरे

गोरागोमटा

स्थावरजंगम

सरमिसळ

दंगामस्ती

सवतासुभा

हेवादावा

गूळखोबरे

साधुसंत

बहिणभाऊ

लाडीगोडी

वजनेमापे









July 2, 2023

गुरुपौर्णिमा मराठी भाषण

'गुरुपौर्णिमा'  'व्यास पौर्णिमा' मराठी भाषण





" स्वप्नांना बघायला वास्तवाचे डोळे लागतात,

 स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागते,

 यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात,

त्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी गुरूंचे आशीर्वाद लाभतात."

              आषाढ पौर्णिमेला व्यासपौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा असे म्हणतात. 'गुरु'  या शब्दांमध्ये सगळे सामावलेले आहे. गुरूंना नेहमी देवतुल्य मानले गेले आहे.ज्या शिष्याने गुरुला देवतुल्य मानले,त्यांनी यशाची शिखरे गाठल्याची अनेक उदाहरणे दिसतात. योग्य गुरू भेटल्याशिवाय माणूस आयुष्यात काहीही करू शकत नाही. महर्षी व्यास, गुरु  द्रोणाचार्य यांचे रामायण- महाभारतातील आदर्श आजही लोकांना नवी दिशा देतात.आई-वडील पंख देतात. त्या पंखात भरारी  मारण्याचेे बळ गुरुजन देतात.

         गुरु परमात्मा परे्षु.प्रत्येक विद्या,कला,,शास्त्र यांच्या निर्मितीमध्ये   गुरु -शिष्याची मोठी परंपरा दिसून येते. गुरु शिष्याचे नाते हे केवळ शिक्षणापुरते मर्यादित नसते. शिष्याच्या मनातील वैचारिक गोंधळ दूर करणारा, समाजाला सकारात्मक दिशा दाखविणारा गुरु असतो. खरंच मित्रांनो.....

 "विद्यालय सुटतं पण आठवणी कधीच सुटत नाहीत

आपल्या जीवनात 'गुरु' नावाचं पान कधीच तुटत नाही."

               आधुनिक काळात सर्व क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानामुळे प्रगती झाली आहे.तरीसुद्धा वेदकाळापासून ज्ञानदानाचे कार्य व प्रसार गुरु-शिष्य परंपरेनेच झालेला आहे व आजतागायत तो सुरू आहे. संत कबीरांनी लिहून ठेवल्याप्रमाणे "गुरु बिन कौन बतावे बाट? " या ओळीची प्रचिती प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला येते. गुरुच्या ज्ञानाने ज्ञानी होऊन ज्ञानाचा योग्य उपयोग  होऊ शकतो व अनेक आदर्श व्यक्तिमत्व घडवून आपला देश अधिक सुखी आणि समृद्ध होणार आहे.

             विद्यार्थी मित्रांनो गुरु म्हणजे काय? तर जगातले दुःख नाहीसे करण्याची क्षमता  ही दुसऱ्याची दुःखे पाहून द्रवणाऱ्या आणि अहंकार सोडून त्याच्या सेवेसाठी सज्ज होणाऱ्या मनुष्याच्या चिमुकल्या हृदयात  आहेत. हेच हृदय म्हणजे गुरु.

         तर शिष्य म्हणजे काय?  शिष्य म्हणजे विद्येची आस असणारा एक नायक. शिष्य ही अशी एक 'बी ' आहे. ती ज्या जमिनीत तुम्ही पेराल तिथे ती फलदायी ठरणारच. शिष्य म्हणजे ज्ञानरूपी सागरात पोहणारा राजहंस. जीवनाशी सांगड घालणारा मूकनायक.

    आयुष्य जगत असताना आपल्याला गुरुने शिकविलेले सदाचरण कायम आपण लक्षात ठेवावयास हवे आणि पुढच्या पिढीकडे संस्कारातून  हस्तांतरित करायला हवे! हीच आपल्या गुरुचरणी आपली खरी गुरुदक्षिणा ठरेल .

 धन्यवाद!


पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा 
संख्याज्ञान :
आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे
देवनागरी संख्याचिन्हे
रोमन संख्याचिन्हे
संपूर्ण स्पष्टीकरणासहित 






July 1, 2023

गुरुपौर्णिमा - मराठी भाषण

 गुरुपौर्णिमेनिमित्त मराठी भाषण



 गुरु हे तेजस्वी सूर्याप्रमाणे असतात. या जगात गुरूंची महिमा थोर आहे.आपले गुरु आपल्याला समाजामध्ये आदर्श व्यक्ती म्हणून जगायला शिकवतात..

    आषाढ शुद्ध पौर्णिमेला ' गुरुपौर्णिमा ' साजरी केली जाते. याच दिवशी आदिगुरू महर्षी व्यासांचा जन्म झाला होता. म्हणून या पौर्णिमेला 'व्यासपौर्णिमा' असेही म्हणतात. ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडवले ,त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे 'गुरुपौर्णिमा'. आपले गुरु हे ईश्वराचे दुसरे रूप  आहेत. आपल्या अनमोल जीवनात सुख-दुःख, सत्य- असत्य  पाप-पुण्य या गोष्टींचे स्पष्टीकरण गुरूंनी केलेले असते.

               एखाद्याच्या अंगी पशुत्व  जरी असले तरी त्याला दैवत्व प्राप्त करून देण्याची शक्ती गुरुमध्ये असते. आपले प्रथम गुरु आई-वडील असतात. तर शालेय जीवनात शिक्षक प्रेरणा,नवनवीन ज्ञान देतात. आपण सर्वांकडून काही ना काही शिकत असतो.

       आपले गुरु आपल्याला चांगल्या मार्गावर चालायला शिकवतात. गैरवर्तन केल्यावर शिक्षाही देतात. आपल्या गुरांना आपल्याकडून  प्रेम आपुलकी आदर आणि आपलं यशस्वी होणं हवं असतं.

 आपले गुरु हे आपल्या जीवनातील आदर्श व्यक्ती आहेत. त्यांचा सन्मान करणे, आज्ञा पाळणे  हे आपलं परम कर्तव्य असते.

 धन्यवाद! 




 पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा स्पर्धा परीक्षा यांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ 350 विरुद्धार्थी शब्द  व्हिडिओमध्ये नक्की पहा.