September 6, 2023

सप्टेंबर महिन्याचे संपूर्ण दिनविशेष






नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,आज आपण पाहणार आहोत, सप्टेंबर महिन्याचे संपूर्ण दिनविशेष

 १ सप्टेंबर

दुसरे महायुद्ध सुरू. (१९३९)


शिवाजी विद्यापीठाची स्थापना. (१९६२)


आयुर्विमा महामंडळाची स्थापना. आकाश क्षेपणास्त्राची चाचणी. (१९९८)


सॅनफ्रान्सिस्को येथे अॅन्झस करार संपन्न झाला. (१९५१)


कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म. (१८८७)


२ सप्टेंबर


थोर समाजसेवक, शिक्षक व साहित्यिक श्री. म. माटे यांचा जन्म. (१८८६)


ज्येष्ठ साहित्यिक वि.स. खांडेकर स्मृतिदिन.

जपानने माघार घेतल्याने दुसरे महायुध्द संपुष्टात आले. (१९४५)


विश्वनाथ आनंद याने त्याचा प्रतिस्पर्धी कास्पारोव्ह याचा परभव करून बुध्दिबळातील विजेतेपद मिळविले. (१९९६)

वि.स. खांडेकर यांचे निधन. (१९७६)


३ सप्टेंबर


महाराष्ट्रशाहीर साबळे झाला. (१९२३)


 श्रीमती अॅनी बेझंट यांनी होमरुलची स्थापना केली. (१९१६)


पंत महाराज बाळे कुद्रीकर यांचा जन्म झाला. (१८५५)


आध्यात्मिक विचारवंत दत्ता बाळ यांचे निधन. (१९८२)


सुविचार :- आत्मविश्वास हा माणसाचा खरा मित्र आहे.

४ सप्टेंबर


 *  भारताचे पितामह दादाभाई नौरोजी जन्मदिन. (१८२५).

 * मोघल आणि छत्रपती शिवराय यांच्या मध्ये पुरंदरचा तह. (१६६५)


*चौथ्या महिला आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ. (१९९५)

 * लॉर्ड बेडेन पॉवेल यांनी सुरू केलेल्या बालवीर चळवळीचा पहिला मेळावा भरविला गेला. (१९०९)

 सुविचार :- अभिमान हा प्रगतीचा शत्रू आहे.

५ सप्टेंबर

 *शिक्षकदिन थोर तत्त्वज्ञ व भारताचे दुसरे राष्ट्रपती राधाकृष्णन  यांचा जन्म.(१८८८)

* शिवरांयाच्या पत्नी सईबाई यांचे निधन. (१६५९ ) थोर समाजसेविका मदर तेरिसा यांचा मृत्यू. (१९९७).

 *नाटककार, कवी रॉय किणीकर यांचा मृत्यू. (१९७८)

सुविचार :- अज्ञान हाच आपला पराजय आहे.


६ सप्टेंबर-

 *  भारत पाक युध्दास प्रारंभ. (१९६५)

 * मराठी रंगभुमीवरील अभिनेत्री कमलाबाई गोखले यांचा          जन्म झाला. (१९०१)

 *बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांचे निधन. (१९९५) 

  *   प्रसारभारती हे विधेयक लोकसभेत मंजूर.


* भारतातील प्रसिद्ध भूगर्भशास्त्रज्ञ सत्यचरण चॅटर्जी यांचा जन्म (१९०५)

 *  संतचरित्रकार महिपतीबुवा तारहाबादकर यांनी समाधी घेतली.


७ सप्टेंबर

दुर्गा खोटे यांचा जन्म झाला. (१९०५)

बँक ऑफ इंडियाची पहिली स्वदेशी बैंक प्रारंभ. (१९०६)

अमेरिकेचे सिनेटर ग्रुपी लॉन्स यांची अंगरक्षकाकरवी हत्या झाली. (१९३५)

जर्मन भारत महोत्सव प्रारंभ झाला. (१९९१)

वैद्यक विषयातील श्रेष्ठ विद्वान व थोर सुधारक डॉ. भाऊ दाजी लाड यांचा जन्म. (१८२४)


८ सप्टेंबर

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन.

लोकमान्य टिळकांवर पहिला राजद्रोहाचा पहिला खटला भरण्यात आला.(१८९७)

गायिका आशा भोसले यांचा जन्म झाला. (१९३३)

पहिल्या भारतीय महिला शास्तज्ञ डॉ. कमला सोहनी यांचा मृत्यू. (१९९७)

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाची  स्थापना आशिया खंडातील इराण देशात झाली.


९ सप्टेंबर


उत्तर कोरिया स्वंतंत्र झाला. (१९४८)

 राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या जसपाल राणाला नेमबाजीमध्ये सवर्णपदक मिळाले. (१९९८)


रविकिरण मंडळाचा पहिला 'किरण' प्रकाशित झाला. (१९२३)


रशियातील सुप्रसिद्ध लेखक टॉलस्टॉय याचा जन्म. क्रांतीवीर हुतात्मा शिरीषकुमार याने देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केले.


१० सप्टेंबर


मॅगनेलने समुद्रमार्गे पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली. (१५१९)


पहिले महाराष्ट्रीयन ब्राह्मण हणमंत दीक्षित इंग्लंडला गेले. (१७८१)

क्रिकेटवीर कुमार श्री. रणजीतसिंह यांचा जन्म झाला. (१८७२)


गणिततज्ञ व ज्योतिषशास्त्रज्ञ लुई जेमिनिक पिले यांचे निधन झाले. (१९२५)


देशभक्त वसंत दाते व नारायण दाभाडे यांनी आत्मबलिदान केले.

गोंविदवल्लभपंत यांचा अलमोडा येथे जन्म. (१८८७)


११ सप्टेंबर


शिकागो येथील सर्वधर्मपरिषदेत विवेकानंदाचे गाजलेले भाषण. (१८९३)

आचार्य विनोबा भावे जन्मदिन. (१७१२)


अहिल्याबाई होळकर यांचे निधन झाले. (१७९५)


मुंबई शहरात विजेचे दिवे चमकले. (१९०५)


हिन्दी कवियत्री वर्मा यांचा मृत्यू झाला. (१९८७)


विश्वबंधुत्व दिन.


१२ सप्टेंबर


विनोबा भावे यांचा मृत्यू (१९२६)


सुप्रसिद्ध संगीतकार जयकिशन यांचे कावीळीमुळे निधन झाले. (१९७१)

गावसकरांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहिर.

औरंगजेबाने आदिलशाहीचा शेवट केला. (१६८६)

प्रतापसिंह भोसले यांचे एकनिष्ठ सेवक रंगो बापूजी गुप्ते हे अन्यायाविरूध्द दाद मागण्यासाठी इंग्लंडला गेले. (१८३९)


१३ सप्टेंबर

हैद्राबादच्या विलिनीकरणासाठी भारतीय सैन्य रवाना झाले. (१९४८)

प्रार्थना समान संस्थापक परमानंद यांचा मृत्यू झाला. (१९४२)


* उत्कृष्ठ हॉकीपटू अरोरा कुलवंत यांचा जन्म झाला. (१९३५)

 क्रांतिवीर जतिंद्रनाथ दास यांनी बोस्टन येथील तुरूंगात प्राण त्याग केला.


* भारत चीन युध्दात चीनने मॅकमोहन रेषा पार करून अरुणाचल प्रदेशात प्रवेश केला. (१९६२)


१४ सप्टेंबर


हिंदी दिवस.


 सर्वजनिक गणेश उत्सवाची सुरूवात. (१८१३)

भारतीय सैन्याने दौलताबादचा किल्ला जिंकून तेथे भारतमातेचे मंदिर उभारले.


★ नटवर्य काशीनाथ घाणेकर यांचा जन्म झाला. (१९३२)


स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते अनंत भिडे यांचा मृत्यू झाला. (१९९८)


१५ सप्टेंबर


भारतात दूरदर्शन सुरू. (१९५९) पहिले केंद्र दिल्ली येथे सुरू झाले.


विख्यात शास्त्रज्ञ गॅब्रिल फॅरनहीट यांचा मृत्यू (१७३६).

तापमापकात पारा वापरण्याच्या योजनेने संशोधनात क्रांती.


विजयालक्ष्मी पंडित यांची संयुक्त राष्ट्र संघाच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून निवड झाली. (१९५३)

 शिक्षणतज्ञ राम जोशी यांचा मृत्यू झाला. (१९९८)


१६ सप्टेंबर


* मराठीतील थोर साहित्यिक जयवंत दळवी यांचे निधन झाले. (१९९४)


* एम. एस. सुब्बालक्ष्मी यांचा जन्म झाला. (१९१६) सुप्रसिध्द इतिहास आबासाहेब मुझुमदार यांचे निधन. (१९७३)


पाऱ्याचा वापर करून तापमापक यंत्र तयार करणारे शास्त्रज्ञ गॅब्रिएल फॅरनहाईट यांचे निधन. त्यांच्याच स्मरणार्थ तापमान फॅरनहाइटमध्ये मोजले जाते. (१७२६)

१७ सप्टेंबर


समाजसुधारक व पत्रकार केशव सीताराम ठाकरे यांचा जन्म झाला.


कवी कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. (१९८७)

चोविसावी ऑलिंपिक स्पर्धा सेऊल येथे सुरू झाली. (१९८८)

हैद्राबाद संस्थान निजामशाहीतून मुक्त झाले. (१९४८)


सुविचार - अज्ञान हे स्वार्थ आणि मोह यांचे निर्माण केंद्र आहे. खाली पडण्यात अपयश नाही तर पडून राहण्यात अपयश आहे.


१८ सप्टेंबर


प्रसिद्ध ब्रिटिश विद्वान डॉ. सॅम्युएल जॉन्सन यांचा जन्म. (१७०९)


हॉलिवूडची सम्राज्ञी समजली जाणारी श्रेष्ठ अभिनेत्री ग्रेटा गार्बो हिचा जन्मदिन. (१९०५)

 महात्मा गांधीजीनी हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी २१ दिवसाचे आमरण उपोषण केले. (१९२४)

 भारताचे माजी उपराष्ट्रपती हिदायतुल्ला यांचे निधन झाले. (१९९२)


१९ सप्टेंबर


इंग्रज मराठे यांच्यामध्ये पहिले नाविक युध्द झाले. (१६७९)

सुप्रसिद्ध संगीत संशोधक विष्णु भातखंडे यांचे निधन झाले. (१९३६)

  पहिला व्यंगचित्रपट 'टीम बोलविली' हा प्रकाशित झाला. ( १९२८)


रोगप्रतिकारक लस शोधून काढणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांचा जन्म.(१८९५)


सुविचार :- अभिमान आणि अज्ञान तरूणपणाची नासाडी करते.


२० सप्टेंबर


 तुकाराम महाराजांच्या विख्यात शिष्या संत बहिणाबाईचे निधन झाले. (१७००)


'सकाळ' व 'साप्ताहिक स्वराज्य' या वृत्तपत्राचे संपादक व मालक नानासाहेब परुळेकर यांचा जन्म झाला. (१९९७)


सुप्रसिद्ध संशोधक जॉर्ज ऑगस्ट यांचे निधन झाले. (१९२५)


 बालक कल्याण केंद्राची सुरूवात झाली. (१९५४)

सुप्रसिद्ध हिन्दी चरित्र अभिनेता अनुपकुमार यांचे निधन झाले. (१९९७)


२१ सप्टेंबर

गोवळकोंड्याची कुतबशाही औरंजेबाने संपुष्टात आणली. (१६८७)

 प्रसिद्ध उद्योगपती व ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक रामकृष्ण बजाज यांचे निधन.(१९९४)

खडीचा वापर करून पक्की सडक तयार करण्याच्या यंत्राचा शोध लावणारे इंग्रज अधिकारी जॉन मॅकॅडम यांचा जन्म. (१७५६)


सुविचार :- आई आणि मातृभूमी यांचे श्रेष्ठत्व स्वर्गाहूनही श्रेष्ठ आहे.


२२ सप्टेंबर


 कर्मवीर भाऊराव पाटील जन्मदिन. (१८८७)

 महिला क्रांतिकारक मॅडम कामा जन्मदिन. (१८६१)

 रोजी हॉकीपटू जंटल आर. एस. यांचा जन्म झाला. (१९२२)

सुप्रसिध्द लेखक रणजीत देसाई यांची गाजलेली 'स्वामी' कादंबरी प्रसिद्ध झाली. (१९६२)

मराठी अभिनेत्री दुर्गा खोटे यांचे निधन झाले. (१९९१)


२३ सप्टेंबर


सत्यशोधक समाजाची स्थापना. (१८७३) > आदीलशाही संपुष्टात आली. (१६८६)

विषुववृत्तीय दिन. 

नेपच्यून गडाचा शोध लागला.

लोकमान्य टिळकांना मंडालेच्या तुरुंगात सहा वर्षासाठी डांबले गेले.(१९०८)


२४ सप्टेंबर


 श्रेष्ठ देशभक्त मादाम भिकाजी कामा यांचा मुंबईत पार्शी कुटुंबात जन्म झाला. (१८६१)


प्रख्यात पार्श्वगायक मोहम्मद रफी यांचा जन्म झाला. (१९२४) पुणे करार झाला. (१९३२)


* आचार्य अत्रे यांच्या मातोश्रींचे निधन झाले. (१९५४) संपूर्ण सूरत शहर प्लेगग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले. (१९९४)


२५ सप्टेंबर 


कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रेरणेने रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली.(१९१९)


श्रीलंकेचे पंतप्रधान सालेमन बंदरनायके यांची बौध्द भिक्षकाकडून हत्या झाली.(१९५९)


पुणे नगरीत पहिली आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली.

 पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म झाला. (१९१६) (१९८३)


२६ सप्टेंबर


लक्ष्मणराव किर्लोस्कर स्मृतिदिन. (१९५६)


न्यूझीलंड स्वतंत्र झाला. (१९०७)


हिन्दी चित्रपट सृष्टीतील थोर संगीतकार हेमंतकुमार मुखर्जी यांचे निधन कलकत्ता येथे झाले. (१९८९)

पत्रकार व माजी खासदार विद्याधर गोखले यांचे निधन. (१९९६)

थोर तत्वचिंतक व लेखक आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर यांचा जन्म.


२७ सप्टेंबर


जागतिक पर्यटनदिन.


राजा राममोहन रॉय स्मृतिदिन. (१८३३)


अनुताई वाघ स्मृतिदिन. (१९९२)

शि. म. परांजपे यांचे निधन झाले. (१९२९)

महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय महासंघाची रत्नाप्पा कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना झाली. (१९९०)


२८ सप्टेंबर

 स्वर्गीय आवाजाची देणगी लाभलेल्या गायनकोकिळा लता मंगेशकर जन्मदिन. (१९२९)

★ लुई पाश्चरचा स्मृतिदिन. (१८९५) + सशस्त्र क्रांतिकारक भगतसिंग यांचा जन्म झाला. (१९०७)

 * देशभक्त अनंत हरी मिश्रा यांना फाशी झाली. (१९२७)


सुविचार :- आळस शरीर घटविते, मनासही खाते.


२९ सप्टेंबर


मुस्लीम समाजसुधारक हमीद दलवाई यांचा जन्म झाला. (१९३२)

आग्रा घराण्यातील प्रसिद्ध गायक उस्ताद युनुस हुसेनखान यांचे निधन झाले.(१९९१)


ब्रिटीश गव्हर्नर क्लाईव्ह लॉईड यांचा जन्म. (१७२५)


सुविचार :- जो निष्कर्म होऊन परमात्माला समर्पीत होतो तोच आनंदाला प्राप्त होतो. आनंद हा असा सुगंध आहे की जो दुसऱ्यावर शिंपीत असताना स्वतःवरही शिंपला जातो.


३० सप्टेंबर


पेनिसिलीनचा शोध लागला. (१९२९)


आरती साहा ही पहिली आशियाई महिला इंग्लिश खाडी पोहून गेली. (१९५९)

 प्रलयंकारी भुकंप होऊन सुमारे दहा हजार लोक मृत्यूमुखी

पडले. (१९९३)


जगप्रसिद्ध संपादक व हिंदुमहासभेचे अध्यक्ष रामानंद चटर्जी यांचे निधन. (१९४३)


सुविचार :- कायद्यापुढे सगळे लहान.